तीन दिवस जिल्हाधिकारी कार्यालय बंद

Foto
औरंगाबाद :  राज्य शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसाचा आठवडा जाहीर केला आहे. यानंतर आठवड्यात दोन सुट्ट्या आल्यामुळे या आठवड्याभरात शासकीय कार्यालयात फक्त तीनच दिवस काम सुरू होते तर चार दिवस शासकीय कर्मचाऱ्यांना सुट्ट्या मिळाल्या आहेत. महाशिवरात्रीची सुट्टी असल्यामुळे सलग तीन दिवस जिल्हाधिकारी कार्यालय बंद राहणार आहे. यामुळे ज्या नागरिकांचे काम आहे, त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात थेट सोमवारीच यावे लागणार आहे.

     महा विकास आघाडी सरकारने शासकीय कार्यालयासाठी पाच दिवसाचा आठवडा जाहीर केला आहे. यामुळे आठवडाभर आतील आठ दिवसांपैकी फक्त पाच दिवस शासकीय कार्यालय सुरू राहणार आहेत. यामुळे आठवड्यातील शनिवार आणि रविवार हे दोन्ही दिवस शासकीय कर्मचाऱ्यांना सुट्ट्या मिळणार आहेत. या आठवड्यामध्ये बुधवारी एकोणावीस फेब्रुवारी रोजी शिवजयंती असल्याने शासकीय कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्यात आली होती तर शुक्रवारी 21 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रि असल्याने जिल्हाधिकारी यांनी जाहीर केलेली सुट्टी शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. शनिवारी शासकीय कार्यालयांना सुट्टी यापूर्वीच जाहीर करण्यात आलेली आहे.  रविवारी सर्व शासकीय कार्यालय बंद राहतात महाशिवरात्रि मुळे शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालय बंद राहणार आहे.  शनिवार आणि रविवार हे शासकीय सुट्टी असल्याने शासकीय कर्मचाऱ्यांना सलग तीन दिवस सुट्टी मिळणार असल्याने तीन दिवस जिल्हाधिकारी कार्यालयातील कामकाज बंद राहील. या आठवड्यात शिवजयंती महाशिवरात्री शनिवार आणि रविवार असे चार दिवस शासकीय कर्मचाऱ्यांना सुट्ट्या मिळाल्या आहेत. त्यामुळे या आठवड्यात फक्त तीनच दिवस शासकीय कार्यालय सुरू होती. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला आहे. सलग तीन दिवस सुट्या मिळणार असल्याने सातत्य कर्मचाऱ्यांमध्ये आनंद दिसून येत असला, तरी सर्वसामान्यांना मात्र आपलं काम करून घेण्यासाठी तीन दिवस वाट पाहावी लागणार आहे.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker