औरंगाबाद : घरी निघालेल्या दाम्पत्याच्या दुचाकीला सुसाट वेगातील ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात रामनाथ किशनराव जौक (वय- 55) जागीच ठार झाले तर त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली. ही घटना शनिवारी रात्री सावंगी बायपास रस्त्यावर घडली.
या अपघाता विषयी अधिक माहिती अशी की, रामनाथ पत्नीसह गोपाळपूर येथे गेले होते.तेथून ते घरी पोखरी गावा कडे जात असताना रात्री नऊ वाजेच्या सुमारास केम्ब्रिज चौक ते सावंगी बायपास रस्त्यावर पाठीमागून आलेल्या सुसाट वेगातील मालवाहू ट्रकने दुचाकीला मागून धडक दिली. या भीषण अपघात रामनाथ हे जागीच ठार झाले.दूर फेकल्या गेल्याने त्यांच्या पत्नी गंभीर रित्या जखमी झाल्या. या प्रकरणी पोलिसात घटनेची नोंद घेण्यात आली आहे.जखमींवर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहे.