सावधान..! चायनिज खाल्याने होतो कॅन्सर

Foto
मानवी शरिराला घातक असलेला अजिनोमोटो हा प्रतिबंधित पदार्थ शहरातील जवळपास सर्वच चायनिज सेंटरवर मोठ्या प्रमाणावर वापरला जात आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य आणि जीव धोक्यात आला आहे. अजिनोमोटोमुळे पोटाचा कॅन्सर होतो, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत असताना अन्न व औषध प्रशासन विभागाने मात्र या प्रकाराकडे डोळेझाक चालवली आहे.  
नूडल्स, सूप, सह चायनिज फूड म्हंटल की  खवय्यांच्या तोंडाला पाणी येणे साहजिक आहे.दैनंदिन जीवनात आता चायनिस फूड हे भारतीयांच्या आहारातील एक अभिवाज्य घटक बनत चालला आहे. मुख्यत्वे  चायनिस हा लहान मुलांचा  तर हा  अत्यंत आवडीचा खाद्यपदार्थ आहे. शहरातील प्रत्येक चौकात चायनीज स्टॉल मोठ्या प्रमाणावर नजरेस पडतात. या प्रत्येक ठिकाणी अजिनोमोटो संदर्भात तातडीने तपासणी होण्याची गरज आहे. अलीकडच्या काळात या चायनिस सेंटर च्या वाढत्या संख्या पाहता यां पदार्थाना खाणार्‍या खवय्यांची संख्या किती प्रचंड
अजिनोमोटोमुळे होतो आतड्यांच्या कॅन्सर
अजिनोमोटो म्हणजे थोडक्यात मोनो सोडो ग्लुकायमेड असते या केमिकलमुळे कॅन्सरचा धोका मोठ्या प्रमाणावर आहे. याच्या नियमित सेवनाने आतड्यांच्या कॅन्सर सह पोटाचे आजार,मळमळ, गॅस होणे शौचास त्रास होणे आदी आजार उदभवतात.या पदार्थाच्या सेवनाने पोटाच्या कॅन्सर चे लहान शाळकरी मुलांमध्ये कॅन्सरचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आढळून येत असल्याने याबाबत काळजी घेण्ये आवश्यक आहे.

तर गोण्या भरूनच असतो साठा
बुढीलेन, रोशनगेट, सिडको, चिष्टीया चौक, जय भवानी चौक, कामगार चौक या भागात एक न्हव्हे तर लाईनीने अनेक दुकाने आहेत.प्रत्येक दुकानावर उघड्यावरच अजिनोमोटो हा विषरूपी पदार्थ ठेवलेला असतो गोण्या च्या गोण्या दुकानात साठवून ठेवलेल्या असतात . हे दुकानदार हा पदार्थ आणतात तरी कोठून याचा शोध घेऊन विक्रेत्यासह दुकांदारावर कारवाई होणे गरजेचे आहे.

असावी हे लक्षात येते. मात्र याच चविष्ट पदार्थाला अधिक रुचकर बनविण्यासाठी दुकानदार यामध्ये प्रतिबंधित असलेलं विष रुपी अजिनोमोटो टाकत आहे. आणि यामुळे कॅन्सरसारखा गंभीर आजार होतो. एवढेच नव्हे तर  अजिनोमोटोयुक्त चायनिसच्या सवयीमुळे लहान मुलांमध्ये कॅन्सरचे प्रमाण वाढले असल्याचा धक्कादायक खुलासा घाटी रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांनी केला असल्याने विषयुक्त चायनिस खाणे किती गंभीर आहे दिसते.
शहरात राजरोसपणे हे विष बाजारात विकला जात आहे. मात्र याकडे अन्न व औषध प्रशासन विभाग काहीच कारवाई करताना दिसत नाही. नागरिकांची आरोग्याची जबाबदारी असलेले हा विभाग शहरात अस्तित्वात तर आहे का, असा प्रश्न   नागरिकांतून विचारला जात आहे. 

-डॉ.भारत सोनवणे,
सहायक प्राध्यापक,विकृती शास्त्र तथा
माजी वैद्यकीय अधीक्षक (घाटी रुग्णलाय) 
 लहानमुलांची संख्या अधिक  
 तज्ज्ञ डॉक्टरांचा धक्कादायक खुलासा
 अजिनोमोटोचा  सर्रास वापर जीवघेणा