मुंबई : राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोनासंदर्भात पत्रकार परिषद घेतली. सध्याचे रुग्ण, संशयित रुग्ण आणि कोरोनाच्या चाचण्यासंदर्भात त्यांनी महत्त्वाची माहिती दिली.
त्यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे-
- -कोरोनाचा मृत्यूदर सध्या कमी आहे, मात्र संसर्गदर जास्त आहे.
- महाराष्ट्रात कोरोनाचे ३२ रुग्ण, कुणाचीही प्रकृत गंभीर नाही
- १८ बाहेरुन संसर्ग होऊन आलेले आहेत, तर १४ जणांना त्यांच्यापासून संसर्ग झाला आहे
- केंद्र तसेच राज्य सरकारने ठरवून दिलेल्या प्रयोगशाळांमध्येच कोरोनाची चाचणी करावी
- सध्या कोरोनाचे ७५ रुग्ण संशयित आहेत
- सात देशांमधून परतणाऱ्यांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे
- रुग्ण पळून जाऊ नयेत म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे
- कुणीही घाबरुन जाऊ नका, काळजी घ्यावी.
- जे रुग्ण विलगीकरण मान्य करणार नाही, त्यांना स्थानबद्ध केलं जाणार
- कोरोनाबद्दल अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार
- कोरोनाची नियमावली न पाळणाऱ्यांवरही कारवाई केली जाणार
- रुग्णांना जेवण, टीव्ही, वायफाय सेवा देण्याचा प्रयत्न
- मुंबईच्या सेव्हन हिल्स भागात १ हजार बेडची व्यवस्था करणार
- कस्तुरबा गांधी रुग्णालयात १४५ बेडची व्यवस्था करणार
- मिरज, सोलापूर, धुळे, औरंगाबादमध्ये कोरोना तपासणी लॅब सुरु करणार
- गर्दी वाढू नये यासाठी जमावबंदीचे आदेश
कुणीही घाबरुन जाऊ नका, काळजी घ्यावी.