भरधाव वेगात असलेल्या चारचाकी कार ने रिक्षाला जोराची धडक दिली या अपघातात रिक्षा मधील सात जण जखमी झाले आहे.जखमीमध्ये तीन चिमुकल्याचा समावेश आहे.ही घटना आज सकाळी औरंगाबाद- नाशिक महामार्गावरील मिटमिटा येथील फौजी ढाबा जवळ घडला.
सचिन थोरात वय-33,बाळू पवार वय-40, कल्पना पवार वय-30,स्वराज पवार,( वय-1), युवराज पवार (वय-अडीच वर्षे) गौरी पवार वय-8,विलास गंगाधर पवार वय-55 (सर्व राहणार पडेगाव)असे अपघातात जखमी झालेल्या ची नावे आहेत.
या अपघात प्रकरणी जखमींनी दिलेली अधिक माहिती अशी की, पवार परिवार वेरूळ येथे जखमी कल्पना यांच्या नातेवाईकांचा घरी रिक्षाने जात होते. घराकडून रिक्षा निघताच मुख्य रस्त्यावर वळण घेत असतानाच भरधाव वेगात आलेल्या इंडिका कारने त्यांच्या रिक्षाला जोराची धडक दिली.दरम्यान रिक्षा पलटी झाली. या अपघातात रिक्षा मधील सर्व सात जण जखमी होऊन रिक्षात अडकले होते.ही घटना शिवसैनिक किसन कनिसे व त्यांच्या मित्रांनी पहिली व तातडीने अडकलेल्या जखमींना बाहेर काढत 108 रुग्णवाहिकेला पाचारण केले.डॉक्टर अवकाश घायतडक, चालक नागेश्वर सूर्यवंशी यांनी स्थनिकांच्या मदतीने जखमींना रुग्णवाहिकेतून घाटी रुग्णालयात दाखल केले. जखमींवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू होते.या अपघाता प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आली आहे पुढील तपास पोलीस करीत आहेत.