निर्भया बलात्कार प्रकरणातील सर्व आरोपींना आज (शुक्रवार) पहाटे 5.30 वाजता फासावर लटकवण्यात आले. मुकेश सिंग (वय-32), पवन गुप्ता (वय-25), विनय शर्मा (वय-26) आणि अक्षय कुमार सिंग (वय-31) अशी या आरोपींची नावे आहेत. निर्भया प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरला होता. 2012 मध्ये घडलेल्या प्रकरणानंतर संतापाची एक लाट देशभरात उसळली होती. तसेच अनेक अशी प्रकरणे बाहेर आली होती जी तोपर्यंत बाहेर येऊ शकली नाहीत. मुंबईतल्याही काही प्रकरणांना याच प्रकरणामुळे वाचा फुटली. निर्भयाला न्याय मिळावा यासाठी सगळ्या देशात एक आंदोलन उभे राहिले होते. ज्याची व्याप्ती दिल्लीत सर्वात मोठ्या प्रमाणावर होती. दरम्यान, दोषींच्या फाशीने आपल्या मुलीच्या आत्म्याला शांती लाभेल अशी प्रतिक्रिया निर्भयाच्या आईनं व्यक्त केली होती.
निर्भया आणि तिच्या कुटुंबियांना अखेर 2650 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर न्याय मिळाला. चारही दोषी विनय कुमार शर्मा, पवन कुमार गुप्ता, मुकेश सिंह आणि अक्षय कुमार सिंह यांना पहाटे 5.30 वाजता फाशी देण्यात आली आहे. निर्भयाच्या दोषींना फासावर लटकवल्याच्या वृत्तावर तिहार तुरुंगाचे महासंचालक संदीप गोयल यांनी शिक्कामोर्तब केले. तिहार जेलमधील क्रमांक तीनच्या तुरुंगात त्यांना फाशी देण्यात आली आहे. फाशीनंतर डॉक्टरांनी चारही दोषींची रितसर मेडिकल टेस्ट घेतल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. तिहार तुरुंगाबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
चारही दोषींना फाशी झाल्यानंतर निर्भयाच्या आईने आपल्या मुलीच्या फोटोला घट्ट मिठी मारली आणि निर्भयाला अखेर न्याय मिळाला असे ती म्हणाली. निर्भयाला न्या मिळवून देण्यासाठी मी न्यायव्यवस्था आणि भारत सरकारचे आभार मानते. आजचा दिवस देशातील महिला आणि मुलींच्या नावे समर्पित आहे. आम्ही फाशीचा आनंद साजरा करणार नाही. पण मी हे जरुर सांगेन की या फाशीनंतर आता गुन्हेगारांमध्ये धाक निर्माण होईल. आजचे सूर्य माझ्या मुलीच्या नावे. देशातील तमाम महिला आणि मुलींचे देखील आभार अशी प्रतिक्रिया निर्भयाच्या आईने दिली.
काय आहे प्रकरण?
दिल्लीत 2012 मध्ये मेडिकलला शिकणार्या एका महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. तिचा लैंगिक छळ करण्यात आला. तिला मारहाण करुन विवस्त्र अवस्थेत फेकूनही देण्यात आले. 16 डिसेंबर 2012 ला घडलेल्या या घटनेमुळे सगळा देश हादरला होता. या मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर पुढील उपचारांसाठी सिंगापूरलाही नेण्यात आलं. मात्र 29 डिसेंबर 2012 ला निर्भयाचा मृत्यू झाला. यानंतर या प्रकरणातील सहा आरोपींना अटक करण्यात आली. 2013 च्या मार्च महिन्यात सहापैकी पाच आरोपींना कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली. हायकोर्टाने 2014 मध्ये या आरोपींची फाशी कायम ठेवली. तर मे 2017 मध्ये सुप्रीम कोर्टानेही ही फाशी कायम ठेवली. ट्रायल सुरु असतानाच या प्रकरणातील मुख्य आरोपी राम सिंह याने तिहार तुरुंगात आत्महत्या केली. एक आरोपी अल्पवयीन होता त्यामुळे त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली.
पवन जल्लादने दिली फाशी
निर्भया प्रकरणातील आरोपींना फाशी देण्यासाठी पवन जल्लाद हे एक दिवस आधीच मेरठ वरून दिल्लीच्या तिहार तुरूंगात पोहोचले होते. त्यांनी सकाळी ठीक 5.30 वाजता या आरोपींना फाशी दिली.
अशी झाली फाशी
7 वर्षे, 3 महीने आणि 4 दिवसानंतर निर्भयाला अखेर न्याय मिळाला. तीच निर्भया जिच्यावर 16 डिसेंबर 2012 च्या रात्री दिल्लीत चार नराधम मुकेश, अक्षय, विनय आणि पवनने बलात्कार केला होता. या दोषींच्या विरोधात कनिष्ठ न्यायालयाने 9 महिन्यांच्या आतच फाशीची शिक्षा सुनावली होती. 6 महिन्यानंतर दिल्ली हायकोर्टाने ही शिक्षा कायम ठेवली. त्यानंतर मे 2017 सुप्रीम कोर्टने देखील फाशीवर शिक्कामोर्तब केला होता. तरीही फाशी होता-होता 2 वर्षे 10 निघून गेले. कोर्टाने शुक्रवारी फाशीची तारीख निश्चित केली होती. तत्पूर्वी दोषींनी 15 तासांत 6 याचिका देखील केल्या. त्या सर्व फेटाळून लावण्यात आल्या. यानंतर पहाटे 5 वाजता फाशी तयारी सुरू झाली. दोषींना फाशीच्या फळीपर्यंत नेण्यात आले. चौघांचे हात-पाय बांधण्यात आले. यावेळी विनय रडत होता. तरीही दोषींच्या गळ्यात फाशीचे दोरखंड टाकण्यात आले. चेहरा झाकण्यात आला आणि जल्लादाने लीवर ओढले. फाशी होताच जणू देशाला न्याय मिळाला अशी भावना सर्वच देशवासियांमध्ये होती. तुरुंग प्रशासनाने 7 मिनिटानंतर चौघांच्या मृत्यूची माहिती जारी केली. त्याच्या 30 मिनिटानंतर डॉक्टरांनी सुद्धा तपास करून दोषींना मृत घोषित केले.
निर्भया आणि तिच्या कुटुंबियांना अखेर 2650 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर न्याय मिळाला. चारही दोषी विनय कुमार शर्मा, पवन कुमार गुप्ता, मुकेश सिंह आणि अक्षय कुमार सिंह यांना पहाटे 5.30 वाजता फाशी देण्यात आली आहे. निर्भयाच्या दोषींना फासावर लटकवल्याच्या वृत्तावर तिहार तुरुंगाचे महासंचालक संदीप गोयल यांनी शिक्कामोर्तब केले. तिहार जेलमधील क्रमांक तीनच्या तुरुंगात त्यांना फाशी देण्यात आली आहे. फाशीनंतर डॉक्टरांनी चारही दोषींची रितसर मेडिकल टेस्ट घेतल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. तिहार तुरुंगाबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
चारही दोषींना फाशी झाल्यानंतर निर्भयाच्या आईने आपल्या मुलीच्या फोटोला घट्ट मिठी मारली आणि निर्भयाला अखेर न्याय मिळाला असे ती म्हणाली. निर्भयाला न्या मिळवून देण्यासाठी मी न्यायव्यवस्था आणि भारत सरकारचे आभार मानते. आजचा दिवस देशातील महिला आणि मुलींच्या नावे समर्पित आहे. आम्ही फाशीचा आनंद साजरा करणार नाही. पण मी हे जरुर सांगेन की या फाशीनंतर आता गुन्हेगारांमध्ये धाक निर्माण होईल. आजचे सूर्य माझ्या मुलीच्या नावे. देशातील तमाम महिला आणि मुलींचे देखील आभार अशी प्रतिक्रिया निर्भयाच्या आईने दिली.
काय आहे प्रकरण?
दिल्लीत 2012 मध्ये मेडिकलला शिकणार्या एका महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. तिचा लैंगिक छळ करण्यात आला. तिला मारहाण करुन विवस्त्र अवस्थेत फेकूनही देण्यात आले. 16 डिसेंबर 2012 ला घडलेल्या या घटनेमुळे सगळा देश हादरला होता. या मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर पुढील उपचारांसाठी सिंगापूरलाही नेण्यात आलं. मात्र 29 डिसेंबर 2012 ला निर्भयाचा मृत्यू झाला. यानंतर या प्रकरणातील सहा आरोपींना अटक करण्यात आली. 2013 च्या मार्च महिन्यात सहापैकी पाच आरोपींना कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली. हायकोर्टाने 2014 मध्ये या आरोपींची फाशी कायम ठेवली. तर मे 2017 मध्ये सुप्रीम कोर्टानेही ही फाशी कायम ठेवली. ट्रायल सुरु असतानाच या प्रकरणातील मुख्य आरोपी राम सिंह याने तिहार तुरुंगात आत्महत्या केली. एक आरोपी अल्पवयीन होता त्यामुळे त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली.
पवन जल्लादने दिली फाशी
निर्भया प्रकरणातील आरोपींना फाशी देण्यासाठी पवन जल्लाद हे एक दिवस आधीच मेरठ वरून दिल्लीच्या तिहार तुरूंगात पोहोचले होते. त्यांनी सकाळी ठीक 5.30 वाजता या आरोपींना फाशी दिली.
अशी झाली फाशी
7 वर्षे, 3 महीने आणि 4 दिवसानंतर निर्भयाला अखेर न्याय मिळाला. तीच निर्भया जिच्यावर 16 डिसेंबर 2012 च्या रात्री दिल्लीत चार नराधम मुकेश, अक्षय, विनय आणि पवनने बलात्कार केला होता. या दोषींच्या विरोधात कनिष्ठ न्यायालयाने 9 महिन्यांच्या आतच फाशीची शिक्षा सुनावली होती. 6 महिन्यानंतर दिल्ली हायकोर्टाने ही शिक्षा कायम ठेवली. त्यानंतर मे 2017 सुप्रीम कोर्टने देखील फाशीवर शिक्कामोर्तब केला होता. तरीही फाशी होता-होता 2 वर्षे 10 निघून गेले. कोर्टाने शुक्रवारी फाशीची तारीख निश्चित केली होती. तत्पूर्वी दोषींनी 15 तासांत 6 याचिका देखील केल्या. त्या सर्व फेटाळून लावण्यात आल्या. यानंतर पहाटे 5 वाजता फाशी तयारी सुरू झाली. दोषींना फाशीच्या फळीपर्यंत नेण्यात आले. चौघांचे हात-पाय बांधण्यात आले. यावेळी विनय रडत होता. तरीही दोषींच्या गळ्यात फाशीचे दोरखंड टाकण्यात आले. चेहरा झाकण्यात आला आणि जल्लादाने लीवर ओढले. फाशी होताच जणू देशाला न्याय मिळाला अशी भावना सर्वच देशवासियांमध्ये होती. तुरुंग प्रशासनाने 7 मिनिटानंतर चौघांच्या मृत्यूची माहिती जारी केली. त्याच्या 30 मिनिटानंतर डॉक्टरांनी सुद्धा तपास करून दोषींना मृत घोषित केले.