आम्ही छत्रपती संभाजी महाराजांचे वंशज आहोत :चंद्रकांत पाटील

Foto
राज्यात सत्ताबदल झाल्यामुळे शिवसेना या मुद्द्यावर काही करणार नाही, असा विरोधकांचा आरोप आहे.

औरंगाबाद: आम्ही छत्रपती संभाजी महाराजांचे वंशज आहोत. औरंगजेबाचे नाही. त्यामुळे औरंगाबादचं 'संभाजीनगर' असे नामकरण झालेच पाहिजे, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. ते शनिवारी औरंगाबादमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्याला हात घातला. औरंगाबाद शहराचे नवा संभाजीनगर व्हायलाच पाहिजे. नामांतराच्या बाबतीत ज्या काही तांत्रिक त्रुटी आहेत. त्या लवकरात लवकर दूर केल्या गेल्या पाहिजेत. आपण औरंगजेबाचे वंशज नाहीत, असे पाटील यांनी म्हटले.
औरंगाबादमध्ये आतापासूनच आगामी महानगरपालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील आज औरंगाबाद दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतल्या. यानंतर पत्रकारांशी बोलताना पाटील यांनी औरंगाबदच्या नामांतरचा मुद्दा उपस्थित केला. त्यामुळे आगामी काळात यावरून औरंगाबादमधील राजकारण तापण्याची शक्यता आहे.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker