दिल्ली तापली ! तडजोड नाहीच, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर सीजेपी ठाम, धर्मेंद्र प्रधान यांच्या सुरक्षतेत वाढ

Foto
नवी दिल्ली : धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाल्याशिवाय मागे हटणार नाही, असा निर्धार अभिजित दिपके यांनी बोलून दाखवला असून दिल्लीतील वातावरण गरम झाले आहे. कॉकरोच जनता पार्टी आणि सरकार यांच्यातील चर्चेची दुसरी फेरी होण्याच्या आधीच हा गर्भित इशारा देण्यात आला असून सरकारने लहान लहान मुलांना मारहाण केली असून आता तिसरी चूक करू नये, असेही सीजेपीने म्हटले आहे. दरम्यान आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. वरिष्ठ अधिकार्‍यांपासून कॉन्स्टेबलपर्यंत सर्वांच्या सुटट्या रद्द करण्यात आल्या आहेत. यासंबंधी दिल्ली पोलीस आयुक्तांनी हे आदेश दिले आहेत. त्यांनी पुढील आदेशापर्यंत सर्व सुट्य्या रद्द करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. तर लोकसभेत प्रधान यांच्या राजीनाम्यावरुन संसदेत घोषणाबाजी सुरु केली आहे.
 
दरम्यान, कॉकरोच जनता पार्टीची बैठक दुपारी दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये होत आहे. यापूर्वी २० जुलै रोजी केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांच्या निवासस्थानी चर्चा झाली होती, परंतु ती अनिर्णित राहिली. यानंतर, सरकारने काल सांगितले की, त्यांनी सीजेपीला चर्चेसाठी चार वेळा आमंत्रित केले होते, परंतु ते उपस्थित राहिले नाहीत. सरन्यायाधीशांनी असेही म्हटले आहे की, ते या विषयावर चर्चा करण्यासाठी केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांच्या निवासस्थानी जाणार नाहीत, तर चर्चा तटस्थ ठिकाणी व्हायला हवी. दरम्यान, सोनम वांगचुक यांनी २६ व्या दिवशी आपले उपोषण संपवले. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांनी मध्यरात्री साडे बारा वाजता मेदांता रुग्णालयाला भेट देऊन त्यांना रस दिला.

आम्हाला अटक होऊ शकते
दरम्यान, अभिजित दिपेक यांनी आम्हाला आज अटक होऊ शकते, अशी भीती व्यक्त केली आहे. आपली एकच मागणी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा आहे. जोपर्यंत राजीनामा होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. दरम्यान, सीजेपी प्रवक्ते आशुतोष रांका म्हणाले की, सरकारवर दबाव होता, त्यामुळेच पंतप्रधानांना मध्यरात्री व्हिडिओ प्रसिद्ध करावा लागला. शिक्षणमंत्री राजीनामा देईपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील, असे ते म्हणाले. या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर, राजीव चौक आणि लोक कल्याण मार्गासह मध्य दिल्लीतील १७ मेट्रो स्थानके आज बंद ठेवण्यात आली आहेत. आंदोलकांनी काल रात्री उशिरा पार्लमेंट स्ट्रीटवरील बॅरिकेड्स तोडले. सीजेपीने आज देशव्यापी आंदोलनांची घोषणा केली आहे. प्रवक्ते आशुतोष रांका म्हणाले की, आम्ही हे अगदी स्पष्ट करू इच्छितो की, जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत जंतर मंतरवरील आंदोलन सुरूच राहील. पंतप्रधानांना रात्री साडेबारा वाजता व्हिडिओ प्रसिद्ध करावा लागला, यावरून प्रचंड दबाव असल्याचे दिसून येते.

सरकार मनमानीपणे वागत आहे
दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, जेव्हा संसदेचे अधिवेशन चालू असते, तेव्हा पंतप्रधानांनी संसदेच्या सभागृहात भाषण केले पाहिजे; त्यांनी रात्री उशिरा व्हिडिओ बनवून संसदेबाहेर एकतर्फी मन की बात देऊ नये. सोनिया गांधी म्हणाल्या, मोदी सरकारने विद्यार्थ्यांच्या धैर्याला भ्याडपणाने आणि क्रूरतेने उत्तर दिले आहे. त्यांना देशाचे भविष्य म्हणून ओळखण्याऐवजी, सरकार त्यांना शत्रू मानत आहे. मोदी सरकारने केवळ भारताच्या शिक्षण व्यवस्थेचा दर्जाच घसरवला नाही, तर मनमानी आणि असंवेदनशीलपणे वागण्याची सवयही लावून घेतली आहे. राहुल गांधी म्हणाले की, आमचे विद्यार्थी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. पंतप्रधानांच्या व्हिडिओचा आमच्यावर परिणाम होत नाही. आमच्या तीन मागण्या आहेत: पहिली, शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा; दुसरी, २० जुलै रोजी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणार्‍यांना शिक्षा; आणि तिसरी, विद्यार्थ्यांची माफी.

व्हडिओवरून राहुल गांधी यांचा पंतप्रधानांवर कडाडून हल्लाबोल
नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी नीट पेपरफुटीसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रात्री उशिरा प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. राहुल गांधी यांनी सरकारसमोर तीन प्रमुख मागण्या ठेवल्या असून, रात्री उशिरा प्रसिद्ध झालेल्या या व्हिडिओवरून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केले, मिस्टर मोदी, आमचे विद्यार्थी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. मध्यरात्री प्रसिद्ध केलेल्या या निरुपयोगी व्हिडिओने त्यांच्या बुद्धिमत्तेचा अपमान करू नका. राहुल गांधी यांनी सरकारला या तीन मागण्या पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. पहिली आणि सर्वात महत्त्वाची मागणी म्हणजे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा ही आहे.

दरम्यान, राहुल गांधी यांची दुसरी मागणी पार्लमेंट चलो मार्च दरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जशी संबंधित आहे. विद्यार्थ्यांवर हल्ला करणार्‍या सर्वांना शिक्षा झाली पाहिजे, असे त्यांचे म्हणणे आहे. राहुल गांधी यांची तिसरी मागणी म्हणजे सरकारने या विद्यार्थ्यांची माफी मागावी. यापूर्वी, राहुल गांधी यांनी एका पत्रकार परिषदेत मोदी सरकारवर गंभीर प्रश्न उपस्थित केले होते.

धोका होता म्हणून सोडले उपोषण; सर्वांना म्हणाले, सतर्क राहा!
सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी २६ दिवसांनंतर आपले बेमुदत उपोषण मागे घेतले असून, हा निर्णय दीर्घ चर्चेनंतर आणि देशात संभाव्य हिंसाचाराची शक्यता लक्षात घेऊन घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. गुरुवारी मध्यरात्रीनंतर हरियाणातील गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात वांगचुक यांनी उपोषण सोडले. यावेळी केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि डॉ. जितेंद्र सिंह उपस्थित होते. त्यांच्या पत्नी गीतांजली याही त्यांच्या सोबत होत्या.

खासदार शाहु महाराज जंतरमंतरवर दीपकेंच्या भेटीला
खासदार शाहु महाराज जंतरमंतरवर दीपकेंच्या भेटीला पोहोचले आहेत. त्याआधी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ङ्गविद्यार्थ्यांवर सातत्याने अन्याय सुरू आहेत. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यायला हवा. काँग्रेसची भूमिका आहे, तीच माझी भूमिका आहे, असं खासदार शाहु महाराज म्हणाले.