काश्मीरमधील हंदवाडा परिसरात तिसर्‍या दिवशीही चकमक सुरूच ; पाच जवान शहीद ; दोन अतिरेक्यांचा खात्मा सुरक्षा दलाचे नऊ जवान जखमी

Foto
जम्मू-काश्मीरमधील हंदवाडा येथील बाबगुंड परिसरात भारतीय सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमधील चकमक तिसर्‍या दिवशीही सुरूच आहे. यात आतापर्यंत पाच जवान शहीद झाले आहेत, तर एक नागरिक ठार झाला आहे. या चकमकीदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली असल्याने शोधमोहीम सुरू आहे.

सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. सीमेवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्‍लंघन सुरूच आहे. सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये शुक्रवारपासून चकमक सुरू आहे. यात आतापर्यंत केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) तीन आणि जम्मू-काश्मीर पोलिस दलाचे दोन जवान शहीद झाले आहेत. या चकमकीदरम्यान दोन्ही बाजूंकडून गोळीबार करण्यात आला. इमारतीत लपून बसलेल्या दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलाच्या जवानांवर बेछुट गोळीबार करण्यात येत आहे. यात नऊ जवान जखमी झाले आहेत, अशी माहिती आहे. दरम्यान, या चकमकीत या चकमकीत पाच जवान शहीद झाले असून नऊ जवान जखमी झाले आहेत. जखमीमध्ये दोन सीआरपीएफचे व सात लष्कराचे जवान आहेत.