अतिवृष्टी नुकसान ग्रस्त भागाची उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली पाहणी

Foto
अतिवृष्टी नुकसान ग्रस्त भागाची उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली पाहणी
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज सकाळी अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. आमदार विलास भुमरे, उपविभागीय अधिकारी डॉ. व्यंकट राठोड हे याप्रसंगी उपस्थित होते. अंबिकापूर ता. छत्रपती संभाजीनगर येथील मोसंबी व ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या शेताची त्यांनी पाहणी केली. अतिवृष्टीमुळे मोसंबी सारखे फळपिक आणि ऊस पिकाच्या झालेल्या नुकसानीची पाहणी त्यांनी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना दिलासा दिला. शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन उभे आहे, असे त्यांनी या वेळी सांगितले. तसेच यंत्रणेला त्वरीत पंचनाम्यांचे काम पूर्ण करावे असे निर्देशही दिले. त्यानंतर सामंत हे जालना जिल्ह्यातील भागाची पाहणी करण्यासाठी रवाना झाले.