नवी दिल्ली : अरुणाचल प्रदेशच्या चिनी सैनिकांच्या घुसखोरीवरून भारत हा चीनवर चांगलाच भडकला आहे. तुमच्या सैन्य दलाची कृत्ये सहन करणार नाही, असा स्पष्ट शब्दात भारताने चीनला खडसावलं आहे. तुमची कृत्ये भविष्यात कदापी सहन करणार नसल्याचे संकेत भारताने चीनला दिले आहेत. दोन्ही देशात काहीशी कटुता निर्माण झाल्याने जागतिक वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
दोन्ही देशाच्या सैन्य दलाच्या प्रमुखांची बैठक झाली. दोघांमध्ये शी संबंधित मुद्द्यांवर चर्चा झाली. ही बैठक रविवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अरुणाचल प्रदेशच्या सुबनसिरी जिल्ह्यातील टाकसिंगमध्ये चिनी सैनिकांच्या घुसखोरीमुळे या बैठकीला महत्व प्राप्त झालं होतं. अरुण प्रदेशातील एका भागात भारतीय लष्कराचे वरिष्ठ अधिकारी गिरीश कालिया यांनी भारताची बाजू चीनसमोर मांडली. त्यांच्या सैन्यातील महत्त्वाचा अधिकारी बैठकीसाठी हजर झाला होता.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल हे मागील महिन्यात चीन दौर्यावर होते. डोभाल यांची चिनी परराष्ट्र मंत्र्यांसोबत बैठक झाली. या बैठकीत एलएसीसहीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. भारताने चीनबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. दुसरीकडे चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग हे याच आठवड्यात ब्रिक्स परिषदेत सहभागी होण्यासाठी भारतात येण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदी आणि जिनपिंग यांच्यात द्विपक्षीय बैठक होणार आहे. त्याआधी दोन्ही देशाच्या लष्करांच्या अधिकार्यांची चर्चा झाली आहे. माजी संरक्षण दलप्रमुखांनी म्हटलं की,सीमा प्रश्न अद्याप सुटला नाही. एलएसीचा मुद्दा कायम आहे. भारत आणि चीन हे दोन्ही आशियातील मोठ्या शक्ती आहेत. तसेच मोठ्या अर्थव्यवस्था आहेत. दोन्ही देशातील संबंध हे सीमा वादापुरते मर्यादित ठेवते येणार नाहीफ. सेवानिवृत्त चौहान यांनी पुढे म्हटलं की, दोन्ही देश एकमेकांना सहकार्य देखील करतात. एकमेकांचे स्पर्धक देखील आहेत. जागतिक व्यवस्थेविषयी दोघांचे वेगवेगळे विचार आहेत. त्यामुळे चीनसोबत संवाद आणि संपर्क ठेवणे आवश्यक आहे.
जिनपिंग भारतात येणार
तत्पूर्वी, भारताच्या अध्यक्षेतेखाली १२-१३ सप्टेंबर रोजी ब्रिक्स शिखर परिषद होणार आहे. या परिषदेत सहभागी होण्यासाठी चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग हे दिल्लीत येण्याची शक्यता आहे. परंतु त्यांच्या भारत दौर्याविषयी कोणतीही अधिकृत माहिती हाती आलेली नाही. जिनपिंग हे जवळपास ७ वर्षांनंतर भारत दौर्यावर येणार आहेत.