छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो)
नवीन जलवाहिनीद्वारे होणारा अतिरिक्त पाणीपुरवठा गेल्या १६ दिवसांपासून बंद होता. वारंवार सूचना देऊनही पाणीपुरवठा पूर्ववत न केल्यामुळे संतप्त झालेल्या महापालिका आयुक्तांनी गुरुवारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि संबंधित कंत्राटदार कंपनीच्या अधिकाऱ्यांची कडक शब्दांत कानउघाडणी केली. परिस्थिती काहीही असली तरी, शुक्रवारी दुपारी १२ वाजेपर्यंत पंपिंगची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले होते. यानंतर, जुलै महिन्याच्या अखेरीपर्यंत अतिरिक्त पाणीपुरवठा करणे शक्य नाही' असा दावा करणाऱ्या एमजेपी आणि कंत्राटदार कंपनीने तातडीने हालचाली सुरू केल्या.
जुलैच्या अखेरीस पंप सुरू करण्याऐवजी, शुक्रवारीच जॅकवेलमधून पंपिंग सुरू झाले.
महानगरपालिका आयुक्तांच्या कठोर भूमिकेनंतर कंत्राटदाराने हालचाली केल्या आणि पाणीपुरवठा सुरू झाला. गेल्या १६ दिवसांपासून नवीन पाईपलाईनद्वारे होणारा अतिरिक्त पाणीपुरवठा बंद होता. वारंवार सूचना देऊनही पाणीपुरवठा सुरू न झाल्याने नाराजी व्यक्त करत, आयुक्तांनी गुरुवारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि कंत्राटदार कंपनीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. शुक्रवारी दुपारी १२ वाजेपर्यंत कोणत्याही परिस्थितीत पंपिंग सुरू करण्याचे निर्दे श आयुक्तांनी दिले होते. त्यानंतर, जुलैच्या अखेरीस अतिरिक्त पाणीपुरवठा करणे शक्य होणार नाही असे म्हणणाऱ्या 'एमजेआयपी' आणि कंत्राटदार कंपनीने तातडीने हालचाली सुरू केल्या.
अतिरिक्त ३० एमएलडी पाणी मिळणार
▶ शुक्रवारी दुपारी ३:३० वाजता जायकवाडी येथील जॅकवेलमधून पाणी उपसण्यास (पंपिंग) सुरुवात झाली. सध्या एक पंप सुरू करण्यात आला आहे. पाईपलाईनमध्ये पाणी उपलब्ध झाल्यामुळे, हे पाणी सायंकाळपर्यंत नक्षत्रवाडी जलशुद्धीकरण प्रकल्पापर्यंत पोहोचण्याची अपेक्षा होती. या केंद्रावर पाण्यावर प्रक्रिया केली जाईल. शनिवारपासून शहराच्या पाणीपुरवठ्यात अतिरिक्त ३० एमएलडी पाण्याची भर पडेल, असे आयुक्तांनी सांगितले.
पुन्हा आठ दिवसांचा शटडाऊन
▶ पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी, मुख्य पाईपलाईनवरील ५० एअर व्हॉल्व्हचे बटरफ्लाय व्हॉल्व्ह बदलून ९०० मिमी व्यासाची पाईपलाईन २५०० मिमी व्यासाच्या पाईपलाईनला जोडली जाईल. याव्यतिरिक्त, ९०० मिमी पाईपलाईन ७०० मिमी पाईपलाईनला जोडून २५०० मिमी पाईपलाईनमधून पाणी मिळवता येईल.
भरपावसाळ्यात अर्ध्या पाणीटंचाईचे चटके
▶ पावसाळ्यापूर्वीच १०० टक्के मान्सूनपूर्व दुरुस्तीची कामे झाल्याचा दावा करणाऱ्या महावितरणकडून शुक्रवारी 'मान्सूनपूर्व' दुरुस्तीच्या नावाखाली शहरातील अर्ध्या भागातील विद्युतपुरवठा बंद केला होता. त्याचा फटका मनपाच्या पाणीपुरवठ्याला बसला असून, दिवसभर शहरातील अनेक भागात पाणी न आल्याने नागरिकांचे हाल झाले. अगोदरच आठ दिवसांनी पाणी असताना आता टप्पेही विस्कळीत झाले आहेत.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions