पैठण, (प्रतिनिधी) : एका जनार्दनी भाव । अवघा विठ्ठलचि देव ।। पवित्र पैठण नगरीतून श्री संत एकनाथ महाराज यांचे १४ वे वंशज ह. भ. प. श्रीनाथ महाराज गोसावी (पैठणकर), यांच्या मार्गदर्शनाखाली ङ्गङ्ता वारी पंढरपूरकडे प्रस्थान झाली आहे.
या वारीचा उद्देश विठ्ठल दर्शन तसेच, संतांनी दिलेला समता, बंधुता आणि समरसतेचा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविणे हा होय. वारीदरम्यान ज्या - ज्या ठिकाणी दिंडीचा मुक्काम होईल, तेथे विविध समाजात जन्मलेल्या आपल्या संतांचे कार्य, विचार आणि समाजप्रबोधनाची परंपरा मांडली जात आहे.
जसे की संत चोखोबा महाराज, संत जनाबाई, संत नरहरी महाराज, संत भगवान बाबा, संत गोरोबाकाका, संत नामदेव महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत एकनाथ महाराज, संत सेवालाल महाराज, संत सेना महाराज इत्यादी आणि इतर अनेक संतांनी दिलेला समरसतेचा अमूल्य वारसा समाजापर्यंत पोहोचविण्याचा हा एक छोटासा प्रयत्न श्रीनाथ महाराज करत आहेत.
यावर्षी अल्प नियोजनामुळे ही वारी प्राथमिक स्वरूपात सुरू झाली असली, तरी पुढील वर्षापासून हा उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबविण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला आहे. पंढरीच्या वारी चा हेतू वीस वर्षात हरवून गेला आहे पंढरीच्या वारीचा हेतू आपल्या साधुसंतांनी अपेक्षित केल्याप्रमाणे साध्य होताना दिसत नाही. म्हणून या समरसतावारीचा आयोजनाचा संकल्प श्रीनाथ महाराज यांनी केला आहे.
स्वस्तिक पाहता वारी हे त्यागाचा समर्पणाच व एकोप्याचं प्रतीक आहे असे साधुसंतांनी सांगितले, की वारी करण्यासाठी बीसी पैसे घेणे हे हा प्रकार आपल्या साधुसंतांना अपेक्षित नव्हता तोही हा प्रकार या वारीच्या माध्यमातून समोर आला आहे.
काही मंडळींनी या वारीला व्यावसायिक स्वरूप दिले आहे. याला कुठेतरी आळा बसून मुख्य प्रवाहात सर्वसामान्य आणि कुठल्याही जाती धर्माचा तसेच गरीब श्रीमंत मध्यमवर्गीय असे सर्व भक्तांनी या समरसता वारीमध्ये सहभाग नोंदवावा असा प्रामाणिक हेतू या समरसता वारीचा आहे. यावर्षी या समरसता वारी बसून सुरू होत आहे. या वारीत सर्वांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन श्रीनाथ महाराज गोसावी यांनी केले आहे.
या वारीचा मार्ग पैठण खानापूर, घोटण तळणी, शेवगाव, अमरापूर, सुसरे अगस्ट, खांडअकोला, करोडी, तारकेश्वर गड गणेश गड मार्गे धामणगाव, कडा आष्टी, करमाळा साधे सौंदे, करकम होळे, जामगाव, अरणगाव चौंडी मार्गे पंढरपूरला पोहोचते आहे. या पवित्र कार्यासाठी श्रीनाथ महाराज आणि सर्व वारकरी बंधू-भगिनींना मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या आहे.













